नवी दिल्ली : राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे. मुंबईतल्या राजभवनामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचे नवे सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला. त्यानंतर राजभवनामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केलेआहे. तसेच राज्याच्या विकासासाठी त्यांनी सर्वजण मिळूण काम करू असेही म्हटले आहे.