हिसार – प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच कॉंग्रेसने हरियानात पराभव मान्य केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. आज येथील एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, संसदेच्या आवारात तीन कॉंग्रेस, नेते हरियानातील निवडणूक प्रचाराच्या स्थितीविषयी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात त्यांनी हा पराभव मान्य केला आहे असे मोदींनी निदर्शनाला आणून दिले.
या व्हिडीओ मधील प्रसंगाचे वर्णन करीत मोदींनी कॉंग्रेसवर पराभव मान्य केल्याचे टीकास्त्र सोडले. यावेळी मोदींनी दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पार्टीवरही टीका केली. हरियानातील जनतेने त्यांचे राजकारण या आधीच नाकारले आहे त्यामुळे ते आता या लोकांना पुन्हा थारा देणार नाहींत असे ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षात मनोहरलाल खट्टर यांनी प्रभावी सरकार दिले आहे. त्यामुळे पुन्हा हेच सरकार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.