नवी दिल्ली – एनसीसी यंदा स्थापनेचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त विवशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी ‘पीएम रॅली’ला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाद्वारे ही माहिती देण्यात आली.
यामध्ये भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा सिंधू जल कराराच्या तरतुदींवर आणि त्यांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम झाला आहे. यामुळे त्यांनी भारताला IWT च्या सुधारणेसाठी नोटीस जारी करण्यास भाग पाडले आहे. असं वृत्त एका संस्थेने प्रसारित केले आहे.
‘वसुधैव कुटुंबकम’ या खऱ्या भारतीय भावनेनुसार, 19 देशांतील एकूण 196 अधिकारी आणि कॅडेट्सना या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी एनसीसीला वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 75 रुपयांचे नाणेही जारी करणार आहेत. या रॅलीमध्ये एक विशिष्ट सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.प्रजसत्ताक दिनाआधी एका केंडेडला संबोधन देताना पंतप्रधान मोदींनी तरुणाईला उद्देशून काही विचार मांडले होते.
यावेळी पंतप्रधानांनी स्वच्छ भारतचा देखील उल्लेख केला होता. स्वच्छ भारत अभियानाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले होते, देशातील प्रत्येक तरुणाने याला जीवनाचे ध्येय म्हणून घ्यावे आणि आपला परिसर, गावे आणि शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी काम केले पाहिजे. त्याचप्रमाणे अमृत महोत्सवादरम्यान स्वातंत्र्यसैनिकांवरील एक तरी पुस्तक वाचण्याचे यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांना आवाहन केले होते.