नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवेरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी होऊन परतलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केलेआहे. दारुण पराभवानंतरही खचून न जाता जिद्दीने यशस्वी पुनरागमन केले. तुम्ही सगळे लढवैय्ये आहात. हा विजय सांघिक कामगिरीचे फलीत आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.
त्यावर बदली कर्णधार अजिंक्य रहाणे यानेही आभार मानले आहेत. तुम्ही केलेल्या कौतुकाने आम्हाला प्रेरणा मिळाली असून यातूनच भविष्यातही असेच यश मिळवू, अशा शब्दात रहाणे याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मोदी यांनी भारतीय संघातील क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या असलेली बॅट भेट दिली व त्याचे छायाचित्रही सोशल मीडियावर पोस्ट केले.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऍडलेड कसोटीत दारूण पराभव पत्करल्यानंतरही ही कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला होता. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने हा अविस्मरणीय विजय मिळवला होता.