नवी दिल्ली : जगातील प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी कोरोनाशी लढण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे. बिल गेट्स यांनी नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. याच पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासंदर्भात बिल गेट्स म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळीच केलेल्या उपाययोजना आणि कठोर निर्णयांमुळेच भारतातील कोरोनाचे संक्रमणातील दरात घट दिसत आहे, जे संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे.
Bill Gates writes to PM Modi: Grateful to see that you’re seeking to balance public health imperatives with the need to ensure adequate social protection for all Indians. https://t.co/DHYub3OriB
— ANI (@ANI) April 22, 2020
बिल गेट्स यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे की, ‘आम्ही तुमचं नेतृत्व आणि तुमच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचं कौतुक करतो. ज्यांमुळे भारतावरील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी आहे.’
बिल गेट्स यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की, ‘तुमच्या शासनाच्या वतीने लॉकडाऊनचा निर्णय घेणं, क्वॉरन्टाईन करणं, आयसोलेशनसाठी हॉटस्पॉटची ओळख करण्यासाठी चाचण्या वाढवणं, आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी प्रयत्न करणं खरचं कौतुकास्पद आहे. याव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेणं आणि डिजिटलायजेशनला प्रोत्साहन देणं देखील कौतुकास्पद आहे.
बिल गेट्स म्हणाले की, ‘मला खरचं आनंद आहे की, तुमचं शासन कोविड-19शी लढण्यासाठी आपल्या असाधारण डिजिटल क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करत आहे. त्यांनी पुढे लिहिलं आहे की, आपल्या शासनाने कोरोना व्हायरस ट्रॅकिंग, संपर्क ट्रेसिंग आणि लोकांना आरोग्य सेवांशी जोडण्यासाठी आरोग्य सेतू डिजिटल अॅप लॉन्च करणं एक उत्तम निर्णय घेतला आहे.’