नवी दिल्ली : ग्रामपंचायतींची भूजल पातळी सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे ‘अटल भूजल योजनेची सुरवात केली.
जलसंकटातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी न्यू इंडियाने आपल्याला तयार केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. कमी पाण्याचा अधिकाधिक वापर कसा करावा. जलजीवन अभियानासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे अनावरणही त्यांनी केले.
‘अटल भूजल योजना’ राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सात राज्यांची पाणी पातळी वाढविण्यात मदत करेल असा विश्वास त्यांनी वयकत केला. सात राज्यांतील 78 जिल्ह्यांमध्ये आठ हजार तीनशे 50 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये भूजल पातळी वाढवण्यात मदत होणार आहे.
मोदी म्हणाले की, ग्रामपंचायतींमध्ये भूगर्भातील पाण्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे तेथील लोकांना बर्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पाण्याची पातळी सुधारण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जाईल.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न या योजनेद्वारे पूर्ण झाले. पाण्याचा विषय त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ होता. पाण्याचे संकट सर्वांसाठी चिंताजनक आहे.’ 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पाणी पोहोचविण्याचा संकल्प आहे.
यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जलऊर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि जलऊर्जा मंत्रालयातील राज्यमंत्री रतन लाल कटारिया उपस्थित होते.