कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारत आपल्या हिंदू अतिरेकी अजेंड्याकडे वाटचाल करीत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे . इतर देशांनी भारताच्या मुस्लिम धोरणाविरुध आवाज उठवावा असं ते म्हंटले.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील गैर-मुस्लिम निर्वासितांना धार्मिक छळाला सामोरे जावे लागत आहे. असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता.
संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक पारित झाल्यांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध करून निषेद केला.