नवी दिल्ली – ट्रॅक्टर रॅलीच्या नावाखाली झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते यांच्या कायदेशीर अडचणी वाढणार आहेत. हिंसक घटना, सार्वजनिक संपत्तीची हानी, पोलिसांवरील हल्ला तसेच लाल किल्ल्यावरील कृत्यासाठी जबाबदार धरले जाणार याची जाणीव झाल्यामुळे संसदेवर मोर्चा घेऊ जाण्याची धमकीवजा भाषा करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आता माघार घेतली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल, जोगिंदर सिंह उग्रा, बीकेयूचे राकेश टिकैत तसेच त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवल्या आहेत. पोलीस कारवाईची शक्यता लक्षात येताच शेतकरी नेत्यांनी हिंसेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकप्रकारे आंदोलनात फूट पडल्याचेच हे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
यावर आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानजी, देश कमजोर करू नका.शेतकऱ्यांवर हल्ला होत असेल तर तो हल्ला देशावर हल्ला होणार आहे. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रियंका गांधी ट्विट
किसान का भरोसा देश की पूँजी है।
इनके भरोसे को तोड़ना अपराध है।
इनकी आवाज न सुनना पाप है।
इनको डराना धमकाना महापाप है।किसान पर हमला, देश पर हमला है।
प्रधानमंत्री जी, देश को कमजोर मत कीजिए।— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) January 29, 2021