समर्थकांसह अर्ज केला दाखल : पदयात्रेस ना. विखे यांची हजेरी
नेवासा – 2014 ला तालुक्यात विकाससाठी परिवर्तन घडले. 2019 मध्ये तालुका सुजलाम सुफलाम करणार आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने आज आ. मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नेवासा येथील पक्ष कार्यालयपासून नेवासा बसस्थानक, गणपती चौक, नेवासा तहसील कार्यालय, अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा मोर्चाचे सचिन तांबे, आरपीआयचे अशोक गायकवाड, अंकुश काळे, नितीन जगताप आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार मुरकुटे म्हणाले, तालुक्यात दबाव व दहशत मोडीत काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या पूजाताई लष्करे, प्रकाश शेटे, एस. बी. शेटे, उदयकुमार बल्लाळ, सचिन तांबे, रशीद इनामदार, अशोक गायकवाड आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन अशोक टेकणे यांनी केले, तर आभार पेचे यांनी मानले. यावेळी अनेक गावांतील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
महायुतीच्या विजयाची खात्री : ना. विखे
जनतेशी पूर्णपणे समरस झालेले हे शासनाचे काम असून, यासाठी वेगळे काम करण्याची गरज नाही. जनतेचे पूर्ण आशीर्वाद महायुतीच्या उमेदवारच्या पाठीमागे असल्याने जिल्ह्यातील सर्व उमेदरांच्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे. तालुक्यात मला काही अडचण असल्याचे वाटत नाही, असे ना. राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संगितले.