नवी दिल्ली – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सत्तासमीकरण अस्तित्वात आल्यानंतर राज्यातून राष्ट्रपती राजवट हटविण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राजभवनात ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
The notification revoking President’s rule in Maharashtra pic.twitter.com/JSbAIOFUE6
— ANI (@ANI) November 23, 2019
दरम्यान, राज्यात २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी लोकसभा निवडणूक पार पडली होती. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेसाठी दावा न केल्याने १२ नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.