नाशिक : :नाशिकच्या कळवन मालेगाव रोडवर झालेल्या अपघातात 25 प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. यावर राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यादी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झालेल्या घटनेचे एकूण दुःख झाले. प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होण्यासाठी मनोकामना व्यक्त करतो असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान मालेगावहून कळवनकडे जाणाऱ्या बसचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला होता. बस चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विहरीमधये कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.