पाचगणी (सादिक सय्यद) प्रतिनिधी : ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय. सातारा शहर आणि महाबळेश्वरमध्येही अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे स्ट्रॉबेरीचं पीक धोक्यात आलं.
गत दोन वर्षाहून कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी असताना आता अनलॅाक नंतर दिलासा मिळालेल्या महाबळेश्वर तालुक्याच्या प्रमुख स्ट्रॅाबेरी पिकावर अवकाळी पाऊसामुळे तालुक्यांतील २००० एकर स्ट्रॅाबेरी पिकावर फळकुज व बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने महाराष्ट्रातील नंदनवनांच प्रमुख पीक स्ट्रॅाबेरी धोक्यात आलं आहे. हवालदिल बळीराजारावर आसमानी संकट कोसळले असस्याचे चित्र अवकाळी पाऊसाच्या तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यांत दिसू लागले आहे .
महाबळेश्वर तालुक्यांतील डिंसेबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये स्ट्रॅाबेरी पिकाला महाबळेश्वर तालुक्यांतील सह्ययाद्रीच्या डोगंर दर्यातील गुलाबी थंडीचे पोषक वातावरणात स्ट्रॅबेरीच पीक वाढीकरता महत्वाच माणलं जात . मात्र गत दोन दिवसात अवकाळी पाऊसाच्या जोरदार तडाख्याने महाबळेश्वर तालुक्यांतील स्ट्रॅबेरीच पीक फळकुज व बुरशी रोगामुळे धोक्यात आले आहे . अवकाळी पाऊसाच्या तडाख्याने बळीराजावर आसमानी संकटाचा डोगंर कोसळल्याने हवालदिल बळीराजाचे प्रचंड आर्थीक नुकसान झाले आहे .
महाबळेश्वर तालुक्यांतील पाचगणी, भिलार , राजपुरी , खिंगर , तापोळा , गुरेघर , मेडगुताड या गावांसह २००० हजार एकर जमीनीवर नाभिया, विन्टर , गाभारोज , स्विटचार्ली या विविध प्रकारच्या स्ट्रॅबेरीच्या जातीची फळ घेतली जातात . महाबळेश्वर तालुक्यांतील प्रमुख पीक म्हणुन स्ट्रॅाबेरी पीक आहे .मात्र चालुवर्षी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय फळ पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने अवकाळी पाऊसाच्या तडाख्याने हवालादिल शेतकऱ्यांवर आसमानी संकटांचा डोंगर कोसळला आहे .
गत काही दिवसांपूर्वीच महाबळेश्वर तालुक्यांतील आतिवृष्टीमुळे तोट्यात आलेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सरकारी खात्यामध्ये मदतीतीकरीता रखडत पडले असताना पुन्हा आसमानी संकटाचं अवकाळी पाऊसाने महाबळेश्वर तालुक्यांतील झोडपलेला पाऊसामुळे बळीराजा पुन्हा आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला असल्याचे चित्र महाबळेश्वर तालुक्यांतील पाहयला मिळत आहे . महाबळेश्वर तालुक्यांतील अवकाळी पाऊसाने हवालादिल शेतकऱ्यावर कोसळलेल्या आसमानी संकटात शासनाकडून मदत मिळावी याकरीता सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी होवू लागली आहे .