क्रिकेटपटू संघटनेला दोन कोटींचा निधी
हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका येत्या शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्या सामन्याने प्रारंभ होत आहे. सराव सामन्यात नियमित सलामीवीरांना संमिश्र यश मिळाले असून जर संघाला आवश्यकता असल्यास सलामीला फलंदाजी करण्याचीही तयारी असल्याचे मत मधल्या फळीतील अव्वल फलंदाज हनुमा विहारी याने व्यक्त केले आहे.
टी-20 मालिका जिंकल्यावर भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात संघाने फलंदाजी चांगली केली असली तरीही मयांक आग्रवाल व पृथ्वी शॉ या सलामीवीरांना पहिल्या डावात अपयश आले होते, त्यावेळी संघाला कसोटीतही आव्हान राहील असे मत व्यक्त केले जात होते, त्या पार्श्वभूमीवर विहारी बोलत होता.
नियमित सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघासमोर सलामीचा प्रश्न आहे.अशा स्थितीत संघाची गरज ओळखून सलामीला येण्याची तयारी असल्याचे विहारीने सांगितले. एक खेळाडू म्हणून मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. संघाला गरज असेल त्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. सराव सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर माझा आत्मविश्वास दुणावला आहे, असेही विहारी म्हणाला.
लोढा समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेटपटू संघटनेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संस्थेचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, त्यांना कामकाज तसेच अन्य कार्य पार पाडण्यासाठी निधीची आवश्यकता होती.
या संस्थेने 15 ते 20 कोटींचे अंदाजपत्रक आखले आहे आणि त्यासाठी त्यांनी 5 कोटी रुपयांची मागणी मंडळाकडे केली होती. पण त्यांना 2 कोटींचाच निधी देण्यात आला. ही संघटना आता मुंबईत एक कार्यालय तयार करणार आहे. कराच्या मुद्द्यावरून 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम एकाचवेळी देता येत नाही. तरीही भविष्यात त्यांना मंडळावर अवलंबून न राहता स्वतः निधी उभारावा लागेल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.