पाटणा : “कोणी पत्र लिहले, तर मी उत्तर देतो. कोणी ट्विट करतेय, तर करू द्या, मला काय त्याच्याशी करायचंय? जर कोणाला पक्षात रहायचे असेल तर त्याने तोपर्यंत पक्षात रहावे, त्याला जर वाटले तर त्याने जावे, अशा शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना सुनावले.
सुधारीत नागरीकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरीकत्व सुचीवरून प्रशांत किशोर पक्षाच्या विरोधी भूमिका घेत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य बनवत आहेत या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांच्या विधानाला महत्व आले आहे. संसदेत का कायद्याला जनता दल संयुक्तने पाठींबा दिला होता. मात्र प्रशांत किशोर त्यावर कठोर टीका करत आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची रणनिती प्रशांत किशोर आखत आहेत. त्यावरून भाजपाशी संबंध बिघडतील का? असे विचारता नितीशकुमार म्हणाले, त्यांचा अनेक लोकांशी संबंध आहे. मी यापुर्वीही सांगितले होते की त्यांना अमित शहा यांच्या आग्रहावरून आम्ही पक्षात प्रवेश दिला आहे.
राष्ट्रीय लोकसंख्या पटातून आई वडीलांच्या जन्मगावाची नोंद काढून टाकावी,अशी मागणी आपण भाजपाकडे करणार आहोत, असे ते म्हणाले.