नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून देशात काँग्रेस पक्षाला देशातील सर्व निवडणुकीतील पराभवासह अनेक अंतर्गत अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधील अनेकांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, पक्षाच्या उभारणी साठी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या पुढे सरसावल्या असल्याचे दिसत आहे.
आता निडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला हरवण्यासाठीचा काँग्रेसने काय करायला पाहिजे? याबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला एक महत्वाचा फंडा सांगितला आहे. काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. शिवाय 2024 मध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर काय केले पाहिजे? याबाबतही प्रशांत किशोर यांनी यावेळी सांगितले.
“काँग्रेसने एक पक्ष म्हणून जो आराखडा तयार केला आहे त्यासह निवडणुकीदरम्यान लोकांपर्यंत पोहण्याची पद्धत आणि लोकांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीत मूलभूत त्रुटी आहेत.” असे प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले, “काँग्रेसचा अध्यक्ष कोणी व्हावे हे मी सांगणार नाही. परंतु, फक्त इतर पक्षांना एकत्र करून भाजपचा पराभव करता येणार नाही. सर्व विरोधक म्हणजे काँग्रेस नाही हे काँग्रेस पक्षाला समजायला पाहिजे. काँग्रेसला सर्वांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे की, नवा अध्यक्ष कोणाला बनवले पाहिजे.”
“पक्षाच्या पातळीवर काँग्रेस खूप खाली घसरली आहे. सर्वात आधी काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे. शिवाय स्थानिक नेत्यांना ताकद द्यायला पाहिजे. याबरोबरच निर्णय प्रक्रीयेला केंद्रीयकृत केले नाही पाहिजे. इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. काँग्रेसला पुढे विजय मिळवण्यासाठी पक्षात खूप बदल केले पाहिजेत. याबरोबरच जो कोणी अध्यक्षपदी निवडला जाईल तो पूर्ण वेळ अध्यक्ष असला पाहिजे.” असा सल्ला प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला आहे.