मुंबई – शिवसेनेशी बंड केल्यानंतर काल मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली. यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपण या मंत्रिमंडळात कोणतेही पद स्वीकारणार नाही असे फडणवीस यांनी याआधी सांगितले होते. मात्र केंद्रीय नेतृत्वाने आग्रह केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. यातच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका होत आहे.
अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ‘बिचारे देवेंद्र फडणवीस’ म्हणत आंबेडकरांनी खोचक ट्वीट केले आहे. त्यांनी पुढे ट्विट केले आहे की,’चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?’ असा सवालही त्यांनी विचारला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट
बिचारे देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला !#Maharashtra
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 30, 2022