मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड गोंधळ सुरु आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून १५ दिवस झाले तरी आतापर्यंत राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना व भाजपमध्ये सत्तेच्या समान वाटपावरून चांगलाच गोंधळ रंगला आहे. दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारतीय संविधानाच्या कलम 172 अनुसार सभागृहाचे सातत्य पुढे टिकून राहण्यासाठी आज सभागृहाच्या शेवटच्या दिवशी सभागृह गठीत करून नवीन आमदारांना शपथ देणे गरजेचे आहे. असे न झाल्यास राज्यापुढे संवैधानिक पेच उभा राहील. या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली.
Mumbai: Vanchit Bahujan Aghadi party chief Prakash Ambedkar along with other party leaders met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, today, to discuss the prevailing political situation in the state. pic.twitter.com/Jjn5jM6qiJ
— ANI (@ANI) November 7, 2019