सांगली : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर तोफ डागली आहे. प्रकाश आंबेडकरांनी भिडे, एकबोटेंना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे गुन्हेगार आहेत तर मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात साक्ष का दिली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते आज सांगलीत सीएए एनआरसी विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. सांगलीत शनिवारी सर्व पक्षांच्यावतीने ‘संविधान बचाव’ रॅलीचे आयोजन कर्मण्यत आले होते.
पुढे ते म्हणाले, ज्यांनी दंगल घडवली त्यांना शासन व्हावे हीच आमची मागणी आहे. जे कोणी या प्रकरणी दोषी आढळलतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. फडणवीस सरकाच्या काळात झालेली चौकशी महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही. केंद्र सरकारने वेगळ्या हेतूने या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे दिली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत काण्याची मागणी देखील त्यांनी केली .