ता. 10, माहे ऑगस्ट, सन 1975
नवी दिल्ली – पंतप्रधानांनी आपल्या अधिकारांच्या केलेल्या अंमलबजावणीबाबत वा बजाविलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्यावर कोणत्याही न्यायालयात खटला भरता येणार नाही, अशी तरतूद चाळिसावे घटनादुरूस्ती विधेयक आज राज्यसभेने मंजूर केले. सध्या अशी तरतूद राष्ट्रपती, राज्यपालांचे बाबतीत आहे. पंतप्रधानांनी सत्तेवर येण्यापूर्वी व सत्तेवर असताना केलेल्या कृत्यांबाबत त्यांच्यावर कोणताही खटला भरता येणार नाही. हेही संरक्षण राष्ट्रपती व राज्यपाल यांना लागू आहेच.
भारतीय लोक सोडा वॉटर कधीपासून पिऊ लागले?
नवी दिल्ली – इ. स. 1811 साली भारतात ब्रिटनमधून सोडावॉटरची प्रथम आयात झाली व तेव्हापासून भारतीय लोक ते पिऊ लागले, असे एका सोडा वॉटर उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्याने केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
निवडणूकबंदीचा काळ राष्ट्रपती ठरविणार
नवी दिल्ली – कोणत्याही व्यक्तीस निवडणूक लढविण्यास किती काळ बंदी घालावयाची, हे ठरविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्याची तरतूद लोकप्रतिनिधित्व कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर होईल.