श्रीगोंदा – भाजपमध्ये विकास करण्याची ताकद आहे, असे मत महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी बेलवंडी येथील सभेत बोलताना केले. बेलवंडी येथे आयोजित प्रचार सभेत बोलतांना पाचपुते म्हणाले, माझ्या राजकीय जीवनात काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी हाच केंद्र बिंदू मानला. मागील पाच वर्षात चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा डोळ्यादेखत जळताना पाहून वाईट वाटले.
घोड, कुकडी विसापूर, साकळाई, सीना या महत्वाच्या शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या प्रश्नाला विद्यमान लोकप्रतिनिधीने कधीच महत्व दिले नाही. ते तालुक्याचे आमदार होते, कि एका गावाचे होते हेच त्यांना समजले नाही. कुकडीच्या बैठकीत या महाशयांनी कधीच तोंड उघडले नाही पण बाहेर आले कि पेपरबाजी करण्यात पटाईत राहिले. माझ्या शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडले. याला जबाबदार कोण याचा जनता जाब विचारणार म्हणून मैदान सोडून पळाले व सांगतात मी कुकडीच्या हितासाठी निवडणूक लढवत नाही. पण तुमचे पाच वर्षातील काम जनतेसमोर सांगायला.
तुम्हाला तोंड नव्हते म्हणूनच निवडणुकीतून माघार घेतली आहे. असे ते म्हणाले.
ज्याने गेल्या वर्षभरापूर्वी जगताप यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले. त्याचे सारथ्य करत आहेत. पण ज्याचे जळते त्याला कळते म्हणून जनता आता हुशार आहे. स्वतःचे वाटोळे करून घेणार नाहीत व पाण्याच्या प्रश्नावर जनता माझ्याबरोबर आहे. हि निवडणूक फक्त जनतेच्या विकासाच्या व पाणी प्रश्नावर लढवत आहे. या तालुक्याचे वाटोळे होऊ देणार नाही. याची हमी देतो, श्रीगोंदा मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद फक्त भाजपमध्येच आहे,असे पाचपुते म्हणाले. यावेळी संग्राम पवार, दिलीप रासकर, शिवाजी शेलार, ज्ञानदेव हिरवे आदी उपस्थित होते.