कोलाकाता, भुवनेश्वर : प. बंगाल आणि ओडिशा या बुलबुल वादळाने तडाखा दिलेल्या राज्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. दूरध्वनी सेवाही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मंत्रीमंडळाचे सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बैठकीत या दोन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
बुलबुल वादळात प. बंगालमध्ये सात जणांना प्राण गमवावे लागले. सुमारे एक लाख घरांची पडझड झाली. तर, ओडीशात जीवित हानी झाली नसली तरी तेथे वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली दोन लाख हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. येथे काही भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुर्ववत करण्यात आला. तर अन्य ठिकाणी मंगळवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत हपोईल, असे सरकारी सुत्रांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून अन्न पुरवठा, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. तसेव नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक या आठवड्यात भेट देईल, दोन्ही राज्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर गरज लागल्याच केंदाकडून मदत मागण्यात येईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. हवामान खात्याने वादळाचा वेळीच अंदाज व्यक्त केल्याने नुकसान रोखता आले. केंद्रीय आपत्कालीन प्रतिसाद पथकाने बचाव आणि मदत कार्यात मोलाची कामगिरी बजावली.