मुंबई – मुंबईमध्ये सोमवारी दीर्घकाळ विजेचा पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती. याशिवाय घरगुती आणि व्यावसायिक वीजपुरवठाही खंडित झाल्यामुळे अख्ख्या मुंबईचे कामकाजच काही काळासाठी खंडित झाले होते. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केले आहे.
नितीन राऊत म्हणाले कि, सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.
The possibility of foul play/sabotage can’t be denied in the power outage incident of Mumbai, Thane and Navi Mumbai on Monday: Maharashtra Energy Minister Nitin Raut pic.twitter.com/wfUw44RAmR
— ANI (@ANI) October 14, 2020
दरम्यान, महापारेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाणे शहर काही काळासाठी अंधारात गेले असल्याचे ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.