उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा कृषी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. सोमवारी दुपारी हि घटना घडली. सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांना दिला गेला नसल्याने कार्यकतें कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी गेले होते.
परंतु कृषी अधीक्षक रजेवर असल्याने कार्यकर्ते कृषी उपसंचालक एस पी जाधव दालनात गेले.परंतु त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयात धुडगूस घातला. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी सोयाबीन पीक विमा लवकर मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा प्रशासनाला इशारा दिला.