देवीप्रसाद अय्यंगार
गेल्या आर्थिक वर्षात तब्बल दीड लाख पोस्टकार्डची झाली विक्री
नगर – माहिती मायाजालाच्या युगात आज अत्यंत वेगवान झालं ईमेल ,व्हॉटसऍपचा जमाना आला तरीही पोस्टकार्डांनी आपलां अस्तित्व राखलंय, नव्हे ते स्वतःची किंमत वाढवून आजही ते दिमाखानं विकलं जातयं. कधी काळी पोस्टकार्डची किंमत 15 पैसे होती. आज त्याची किंमत 50 पैसे झालीयं आणि सरकारी जाहिराती छापलेलं मेघदूत नावाचं पोस्ट कार्ड आजही केवळ 25 पैशांत मिळतयं. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास दिडलाख पोस्टकार्डची विक्री झाल्याची माहिती पोस्ट कार्यालयाकडून मिळाली आहे.
काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत आपली खुशाली किंवा आवश्यक निरोप केवळ 50 पैशात पोहोचवता येतो.ही किमया फक्त पोस्टकार्डच्या माध्यमातूनच साध्य होतेय . आजच्या इंटरनेटच्या जमान्यात मोबाईल वरून ख्याली खुशाली विचारली जाते. अगदीच आवश्यक निरोप द्यायचा असल्यास एस एम एस किंवा व्हॉटस ऍप किंवा ज्यांचे ईमेल सेवेशी संबंध आहे त्यांच्यासाठी मेल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे.तरी सुद्धा पोस्टकार्डचाही वापर केला जातोय . सणासुदीच्या दिवसात याकार्डांचा वापर भेटकार्ड म्हणून करणारेही अनेक जण आहेत. पोस्टकार्डांची एव्हढी विक्री कशी झाली असा प्रश्न सहजच पडतो. त्याच कारणंही तसच आहे.
नविन एखादा कॉंम्प्युटरचा कोर्स सुरू झालाकी त्याची थेट आपल्या ग्राहक वर्गाशी संपर्काचं साधन म्हणजे पोस्टकार्ड, किंवा नवे कोचिंग क्लासची सुरवात झाली की नेमक्या आपल्या ग्राहकाशी संपर्क करण्याचं साधन म्हणून पोस्ट कार्डचा वापर वाढू लागला आहे.एव्हढंच नव्हे तर विमा कंपन्या बॅंका आपल्या ग्राहकांना हप्त्याची माहिती करून देण्यासाठी तसेच इतर माहिती देण्यासाठी पोस्ट कार्डचाच वापर करतात. एव्हढंच काय महाविद्यालय,शाळातूनही मेघदूत पोस्टकार्डाचा मोठा वापर केला जातो. मेघदूत पोस्टकार्ड म्हणजे सरकारी योजनेची जाहिरात छापलेलं पोस्टकार्ड त्याची किंमत 25 पैसे आहे या कार्डला मागणी जास्त आहे त्यामुळे या कार्डचा कायम तुटवडा जाणवतो. जिल्ह्यातील पोस्ट कार्डच्या विक्रीकडे एक नजर टाकली तरी सहज लक्षात येत की इंटरनेटच्या जमान्यात पोस्टकार्डने आपलं अस्तित्व राखलंच नाही तर ते किंमत वाढली तरी विकलं जातं गेल्या आर्थिक वर्षात जवळपास दिडलाखाच्या वर पोस्टकार्ड विकली गेली.
छपाईपेक्षा किंमत कमी
पोस्टकार्डचा कागद आणि छपाईखर्च हा पोस्टकार्डच्या किंमती पेक्षाही जास्त असतो.तरी देखील सेवा म्हणून पोस्टकार्डची किंमत 50 पैसे तर मेघदूत कार्डची किंमत 25 पैसेच ठेवली आहे. विशेष म्हणजे पतसंस्था, बॅंका, विमा कंपन्या किराणामालाचे व्यापारी, कोचिंग क्लासवाले असे मातब्बर ग्राहक यासेवेचा लाभ घेतांना दिसतात,अशी माहिती संदिप हदगल यांनी दिली.