नवी दिल्ली – यावर्षी संपूर्ण देशामध्ये पर्जन्यमान चांगले झाले आहे. त्यामुळे खरिपाचे उत्पादन विक्रमी होणार आहे. रब्बी हंगामाची पेरणीही जोमात चालू असून रब्बी हंगामातील उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे.
14 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 4.31 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी आतापर्यंत 4.21 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी पूर्ण झाली होती. सरकारने डाळी आणि तेलबिया अधिक प्रमाणात लावाव्यात यासाठी आवाहन केले आहे. त्याला शेतकऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.