नागपूर – मेलेल्या गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
जस्टिस व्हि. एम. देशपांडे आणि अनिल किशोर यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. मृत गायी किंवा बैल यांची कातडी बाळगणं हा गुन्हा नाही असे स्पष्ट केले आहे. त्याच बरोबर कातडी बाळगण्यास बंदी घालण्याची अधिसुचना, सूचनापष किंवा आदेश राज्य सरकारने काडले तरीनतो सध्याच्या कायद्याच्यापेक्षा वरचढ असू शकत नाही, असेही स्पष्ट केले.
मेलेल्या गायीची कातडीची वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा चालक शफीकुल्ला खान याने 14 डिसेंबर रोजी यासंदर्भातली याचिका दाखल केली होती. त्याच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खंडपीटाने रद्द बातल ठरवले.