कोलकाता – करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात उत्तरप्रदेशातून अनेक मृतदेह वाहात आमच्या राज्यात आले आहेत. त्यातुन आमच्या राज्यातील नदी अधिक प्रदूषित झाली आहे अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
त्या म्हणाल्या की मालडा जिल्ह्यात असे अनेक कुजलेले मृतदेह आढळून आले असून आम्ही ते मृतदेह बाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. त्या म्हणाल्या की गंगा नदी उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमधून पश्चिम बंगालमध्ये येते आणि येथून ती बंगालच्या उपसागराला मिळते.
या नदीतून उत्तरप्रदेश आणि बिहारमधून अनेक मृतदेह आमच्या राज्यात आले असून येथील गंगा नदी त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे असा दावा त्यांनी केला.