नवी दिल्ली – २०१९ लोकसभा निवडणूक आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून, पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेश कडे वळल्या आहेत. लोकसभेसाठी उद्या (१९ मे) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात राज्यातील तेरा जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात अनेक दिग्ज नेत्यांचे भविष्य एव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे. यातील वाराणसी मतदारसंघात देखील उद्या मतदान होणार आहे.
मोदींचा वाराणसीमधून विजय पक्का मानला जातो. पण राज्यातील अन्य 12 जागांवर मात्र भाजप विरुद्ध सपा-बसपा आघाडी अशी जोरदार लढत होणार आहे. याशिवाय काही ठिकाणी काँग्रेस देखील मैदानात उतरला आहे. त्यामुळे उद्याची ही निवडणूक अधिक चुरशीची असणार आहे. निवडणुकीतील उद्याचा टप्पा भाजपसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. उद्या ज्या १३ जागांवर मतदान होणार आहे. त्यातील सर्वच जागांवर भाजपने मोदीलाटे मुळे २०१४ मध्ये विजयाचे झेंडे रोवले होते. पण आताची परिस्थिती बदली असून, ५ वर्षानंतर ही सर्व मते भाजपला मिळणार का अशा सवाल उपस्थित झाला आहे.