भंडारा : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. भंडारा येथे बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आला आहे.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कलाकारांच्या शुटींगवर गदा आणण्याचे वक्तव्य करणे म्हणजे नाना पटोले यांचा पब्लिसिटी स्टंट आहे. कलाकारांचे शुटींग तुम्ही कसकाय रोखू शकता, असा सवाल करत फडणवीसांनी देशात कायदा आणि सुव्यवस्था असल्याचे म्हटले आहे.
This is Nana Patole’s publicity stunt as he has been newly elected as the state Congress president. How can anyone stop shooting? There is democracy and law in the country: Maharashtra LoP & BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/kNA9OnDBsT
— ANI (@ANI) February 18, 2021
नाना पटोले म्हणाले की, पेट्रोल, डिझेल दरवाढीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनमोहन सिंह सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे, असं त्यांनी म्हटलंय. केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणांच्या विरोधात या कलाकारांनी भूमिका मांडावी, असंही नाना पटोले म्हणाले.
Manmohan Singh ji as PM kept fuel prices low despite surge in crude oil prices in global market. Amitabh Bachchan & Akshay Kumar tweeted at that time demanding fuel be sold for Rs 5-10. The way Modi govt is hiking fuel prices, why aren’t they tweeting now?: MPCC chief Nana Patole pic.twitter.com/5pgpWjSyTK
— ANI (@ANI) February 18, 2021