नवी दिल्ली: “फणी’ चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चांगलेच धुमाकूळ घातले. याच वादळावरून आता राजकारणात देखील वादळ निर्माण झाले आहे. तृणमूल कॉंग्रेसने फणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
दरम्यान, फणी चक्रीवादळासंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन करण्यात आला मात्र त्यांनी तो नाकारला गेला. पीएमओमधील अधिकाऱ्यांनी दोन वेळा मोदींची मुख्यमंत्री ममता यांच्याशी बोलण्याचा फोन केला. पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. नाव न सांगण्याच्या अटीवर पीएमओमधील सूत्रांनी ही माहिती दिली.