सातारा – देशभरासह राज्यावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले असून या जीवघेण्या आजाराचा सामना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्यातील पुणे शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून पुण्यालाच लागून असलेल्या सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनांचा अवलंब करत आहे. विशेष म्हणजे सातारा पोलिस देखील कोरोनाला दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून याबाबत जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दैनिक प्रभातला माहिती दिली.