शिरूर (प्रतिनिधी) – रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारेगाव रांजणगाव ढोकसांगवी परिसरातील शेकडो परप्रांतीय कामगारांनी काल रात्री अचानक रात्रीचा फायदा घेत पायी चालत आपल्या गावी जाण्यासाठी निघाली असता शिरूर जवळ शिरूर पोलिसांनी त्यांना अटकाव करून थांबवले. यामुळे पोलीस महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली,एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार रस्त्यावरून निघाल्याने या कामगारांना थांबवण्यासाठी प्रशासनाची दमछाक झाली,शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी मोबाइल द्वारे या कामगारांना विनंती करून त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यानंतर कामगार शांत झाले.
परंतु या कामगारांची थांबण्याची तयारी नव्हती परंतु पोलिस प्रशासनाने जास्ती कुमक मागून या सर्व नागरिकांना याठिकाणी थांबवले यात काळी महिलांचाही आणि लहान मुलांचाही समावेश होता.
त्यानंतर घटना स्थळी शिरूरचे तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याठिकाणी येऊन या परप्रांतीय कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रात्री दीड वाजता शिरूर चे आमदार अशोक पवार यांनी मोबाईल साहाय्याने या नागरिकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यावर अखेर हे परप्रांतीय कामगार शिरूर येथे थांबण्यास तयार झाली. त्यानंतर शिरूरच्या तहसिलदार लैला शेख पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मयुर लॉन्स तर्डोबाचिवाडी, न्हावरे फाटा येथील मंगल कार्यालयात यातील जवळपास साडेचारशे कामगारांची राहण्याची व्यवस्था केली तर उरलेले कामगार ते राहत असलेल्या कारेगाव ढोकसांगवी या परिसरात पुन्हा पाठवण्यात आले. रात्री या कामगारांच्या भेटीला बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना व दौंड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
आज सकाळी शिरूरचे आमदार अशोक पवार , प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी या कामगारांची भेट घेतली. शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी या सर्व कामगारांची राहण्याची की सकाळी नाश्ता जेवण त्यांना लागणारे पाणी या सर्वांची व्यवस्था केली होती तर शिरूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या वतीने या सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
येथील या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मध्यप्रदेश व यूपीमध्ये सोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले असून यातील मध्यप्रदेशातील कामगारांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी त्यांच्या राज्याच्या कडून हो मिळाला असून मात्र उत्तर प्रदेश येथील सरकारने जे कामगार त्यांच्या राज्यात येणार आहे त्यांची कोविड चाचणी करून त्यांना पाठवावे अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश येथील लोकांसाठी लवकरच स्पेशल ट्रेनचा आयोजन करणार असून त्यांना पाठवण्यात येणार आहे तर यूपीच्या ही ही नागरिकांना त्यांच्या भागात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अँड.अशोक पवार आमदार शिरूर,हवेली
महसूल विभागाच्या वतीने तलाठी मंडलाधिकारी महसूल कर्मचारी यांच्यामार्फत परप्रांतीय कामगारांची जिल्हानिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू असून, यादीप्रमाणे त्यांची माहिती गोळा करीत असून त्यांची आरोग्य ही तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या कामगारांच्या राहण्याची जेवणाची ची सर्व तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
लैला शेख तहसीलदार शिरूर