मुंबई – यंदाच्या वर्षभरात गोवंडी परिसरातून बेपत्ता झालेल्या नऊ महिला आणि आठ मुलींचाशोध लावण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिसांच्यावतीने देण्यात आली आहे. ज्या आठ मुली बेपत्ता झाल्या होत्या त्यांचे अपहरण करण्यात आले होते.
पोलिसांनी त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा करून त्यांना अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून आणले आहे. यंदा वर्षभराच्या काळात गोवंडी परिसरातून एकूण 15 महिला बेपत्ता झाल्या होत्या त्यातील 11 महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले अन्य महिलांचा शोध जारी आहे. महिला व मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांचा पोलिसांकडून गांभीर्याने पाठपुरावा केला जात आहे.