आळंदी -आळंदीसह पंचक्रोशीत करोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने वारंवार नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे; मात्र अनेक जण या आवाहनाला केराची टोपली दाखवत आहेत, त्यामुळे विनामास्कवाल्यांकडून दंड वसूल केला जात आहे; मात्र नियम मोडल्यावर पोलीस पठाणी पद्धतीने दंड वसूल करीत असल्याचा आरोप आळंदीकरांकडून केला जात आहे.
दिवसेंदिवस करोनाचा आकडा वाढत असून रस्त्यावर फिरताना, व्यावसायिक ठिकाणी मग तो मालक असो वा कर्मचार, सामन्य नागरिक यांनी मास्क लावणे अनिर्वार्यच आहे; मात्र आळंदीत अनेक जण विनामास्क फिरत असून हॉटेल, दुकान आदी व्यावसायिक ठिकाणीही कामगार, मालक विनामास्क वावरत आहेत.
त्यामुळे आळंदी पोलिसांकडून त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे किमान आता तरी आळंदीकरांनी जागे व्हावे, असे आवाहन केले जात आहे.