राजगुरूनगर: हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील टोळी युद्ध संपवण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम उघडली असून, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावार सिंघम स्टाईलने दादागिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेत सर्वांसमोर उठाबशा काढण्याची शिक्षा केली. पोलिसनाच्या या कारवाई मुळे कॉलेज मध्ये भाईगिरी करणाऱ्यांवर जरब बसली आहे.
राजगुरूनगर शहरातील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात अल्पवयीन विद्यार्थ्यांना वारंवार टोळीयुध्द होत आहे. गेल्या चार दिवसांपासून महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अशी भांडणे होत असल्याचे निदर्शनास आल्यावर खेड पोलिसांनी बुधवारी (दि २८) अशा विद्यार्थ्यांना पोलिसी प्रसाद देऊन समज दिली. पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईचे विद्यार्थी, पालकांमधुन स्वागत होत आहे. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुर महाविद्यालयात खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन विद्यार्थी येतात. या महाविद्यालयात ८ हजार विद्यार्थी – विदयार्थीनी शिकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाल्याने दहशत निर्माण झाली होती.
बस स्थानकावर छेडाछेडीपासून ते मुलींच्या मागून टाँट मारत येणे, जवळून वेगात दुचाकी नेणे. असे प्रकार वारंवार घडत आहेत. ठराविक मुले मोठ्याने आरडाओरडा करत असतात. त्यामुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. काही विद्यार्थी समूहाने येत दादागिरी करीत असतात त्यातून दोन गटात भांडणे होत असल्याचे प्रकार घडत आहेत. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असतानाही येथे वारंवार विद्यार्थ्यांची भांडणे, मुलींची छेडछाड होत असल्याने पालिसांनी आज ही कारवाई केली.
महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांची अशाच पद्धतीने भांडणे हाणामाऱ्या सुरु होत्या. ठाण्या समोरच हे घडत असल्याने पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक निरीक्षक श्रीराम पडवळ, पोलीस विक्रमसिंह तापकीर, संजय नाडेकर, विकास पाटील, निखिल मोरमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. हाणामारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडून चोप देऊन उठाबशा मारण्याची शिक्षा केली. पोलीस निरीक्षक चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना समुपदेशन केले.