कर्नाल (हरियाणा) – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीबाहेर निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बेछुट लाठीमार केला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार चांगलेच संतापले.
पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. अनेकांची डोकी फुटल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांत व्हायरल झाली आहेत. या घटनेने देशांत संतापाची लाट उसळली आहे.
The brutal lathi charge on farmers by the Haryana Police at Gharonda, in Karnal is absolutely unwarranted. Despite the peaceful protest by farmers, the police launched a lathi charge on them resulting into many farmers getting injured.
I strongly condemn this incident. pic.twitter.com/D0b0a4MOvF— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 28, 2021
यावरून शरद पवार म्हणाले की, ‘हरियाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकऱ्यांवर निर्दयीपणे केलेला लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आहे. येथील शेतकर्यांनी शांततेत सरकारचा विरोध केला. तरीही पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.’ असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.