मुंबई – भारतात घुसलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचा महामोर्चाचे आयोजन केले होते. यानंतर पोलिसांनीही धडक कारवाई सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत दहशतवाद विरोधी पथक व मानवी तस्करी विरोधी शाखेने कारवाई करून २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
अर्नाळा भागात बांगलादेशी असल्याची माहिती मिळताच दहशदवाद विरोधी पथक व मानवी तस्करी विरोधी शाखेने कारवाई केली. यामध्ये विरार पश्चिम येथील कळंब, अर्नाळातून मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनीही पंच म्हणून पोलिसांसोबत घटनास्थळी जात कारवाईसाठी मदत केली.
Maharashtra: Anti-terrorism cell and anti-human trafficking unit has arrested 23 Bangladeshi nationals, living illegally in Palghar district’s Virar. Arnala Police is carrying out further investigation.
— ANI (@ANI) February 12, 2020
सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून ही कारवाई सुरु होती. या लोकांनी मराठीही शिकल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ही कारवाई मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेचे महेश गोसावी, पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, दहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांनी केली आहे.