नवी दिल्ली – नव्य अकृषी कायद्यांविरोधात आज दिल्लीत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू आहे. या मोर्चाला हिंसक वळण लागले असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली आहे. अनेक ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. अशातच दिल्लीत प्रवेश केलेले लोक आमचे नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हंटले आहे.
दिल्लीमध्ये प्रवेश करून हिंसा आणि तोडफोड करणाऱ्या लोकांशी संघटनेशी कोणताही संबंध नाही. भारतीय शेतकरी युनियन, किसान मजदूर संघर्ष सामिती आमच्या मोर्चाचा हिस्सा नाही. ते त्यांचे निर्णय स्वतंत्ररित्या घेतात, असेही संयुक्त किसान मोर्चाने सांगितले आहे.
दरम्यान, आंदोलनकर्ते आणि पोलीस असा संघर्ष चिघळत असतानाच संतप्त आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी काही आंदोलक धावून आले. त्यांनी त्याची सुखरुपपणे सुटका केली.
#WATCH: A Delhi Police personnel rescued by protesters as one section of protesters attempted to assault him at ITO in central Delhi. #FarmLaws pic.twitter.com/uigSLyVAGy
— ANI (@ANI) January 26, 2021