नवी दिल्ली : जम्मू काश्मिरचा भाग असणाऱ्या परंतु पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भूभागावर दहशतवाद्यांचेच नियंत्रण आहे, असे विधान लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी केले.
लष्कराच्याकमांडरांच्या परिषदेत रावत बोलत होते. ते म्हणाले, पाकिस्तानने बेकायदा बळकावलेल्या या भूभागावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण नाही तर त्यावर आता दहशतवाद्यांचे नियंत्रण आहे. पाकव्याप्त काश्मिर हा दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखालील काश्मिर बनला आहे.
आपण जम्मू काश्मिर म्हणतो, त्यावेळी पाकव्याप्त काश्मिर आणि गिलगिट बाल्टिस्तानचा समावेश असतो. म्हणून पाकव्याप्त काश्मिर आणि गिलगिट हा प्रदेश बळकावलेला प्रदेश आहे. तो आमच्या पश्चिमेकडील शेजाऱ्याने बळकावला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कलम 370 हे तात्पुरत्या स्वरूपात लागू करण्यात आले होते. हे कलम लागू करण्यात आले तेंव्हा त्यातील तात्पुरत्या शब्दावर कोणीही आक्षेप घेतला नाही. मग आतच पाकिस्तान त्या बकलमाबाबत का बोलू लागला आहे, असा सवाल त्यांनी केला.
लष्करप्रमुख म्हणाले, ते असे करत आहेत कारण, पाकिस्तानने बेकायदा बळकावलेल्या भूमीत पाकिस्तान सरकारचे नियंत्रणनाही. तेथे दहशतवाद्यांचे नियंत्रण आहे. पाक व्याप्त काश्मिर हा दहशतवाद्यांचे नियंत्रण असणारा पाकिस्तानातील भूभाग आहे.