नवी दिल्ली – श्रद्धा खून प्रकरण अजूनही दिल्ली पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.अनेक राजकीय नेत्यांनी देखील याबाबत भाष्य केलं. मध्य प्रदेशातील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असून मुलींना जागरूक करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, श्रद्धा या मुलीचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि एक एक करून फेकून दिले. लव्ह जिहादचे विष आपल्या समाजात पसरत आहे, हा देशाला कलंक आहे. त्याची जनजागृती करून नाश करणे ही आपली जबाबदारी आहे. कारण हिंदू असं कधीच करत नाही. असा निर्घृण खून असा क्रूरपणा फक्त लव्ह जिहादवालेच करू शकतात.
मुलींना जागृत करणे गरजेचे…
साध्वी यावेळी म्हणाल्या, आपल्याला मुलींमध्ये ही गोष्ट जागरूक करावी लागेल की तुम्ही हिंदू असाल तर हिंदूंमध्येच लग्न करा. प्रेम वेगैरे काही नाही. लव्ह आता जिहाद झाले आहे. पूर्वी प्रेम असायचं, प्रेम म्हणजे समर्पण. आम्ही संन्यासी एक गोष्ट सांगतो,जेव्हा आम्ही प्रेम करतो तेव्हा अतूट प्रेम करतो. परमेश्वराला शरण जातो.साध्वी पुढे म्हणाल्या, प्रेमाच्या परिभाषेला लव्ह केले आहे आणि लव्हच्या पुढे जिहाद जोडले आहे.