वाघोली,( दत्तात्रय गायकवाड) – पीएमआरडीए च्या विकास आराखड्यात बदल करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/560561481801378
याबाबत दाभाडे यांनी सांगितले की लवकरच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकास आराखड्यातील आरक्षण बदलण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले.