नवी दिल्ली – येत्या रविवारी म्हणजेच 5 एप्रिल रात्री 9 वाजता 9 मिनिटं घरातील सगळे लाईट बंद करून आपल्या दारात किंवा बाल्कनीत दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचे लाईट लावा. कोरोनाच्या अंधाराला दूर करून प्रकाश दाखवायचा आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद मोदींनी देशवासियांना केलं आहे आहे.
या 9 मिनिटात आपल्याला सोशिअल डिस्टन्स पाळायचं आहे. त्या सोशियल डिस्टन्सचं कुठेच उल्लंघन होणार नाही याची आवर्जून काळजी घ्या, असंही ते म्हणाले.
दरम्यान, जनता कर्फ्युच्या दिवशी अनेकजण बाहेर निघून घंटानाद केला. लोकं जमावाने बाहेर पडली होती हे चुकीचं आहे मात्र 22 मार्चला जनता कर्फ्युमध्ये काही देशवासियांनानी चांगला प्रतिसाद दिला त्या बाबतीत मी त्यांचं कौतुक करतो. त्यासाठी मी सगळ्या भारतीयांचा आभारी आहे.