गांधीनगर – गुजरातमधील भरुचमध्ये आयोजित ‘उत्कर्ष समरोह’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनेकदा माहितीच्या अभावामुळे अनेक लोक योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. कधी कधी योजना कागदावरच राहतात, पण जेव्हा हेतू स्पष्ट असतो तेव्हा त्याचे परिणामही होतात. यासोबत ते म्हणाले की, मी राजकारणात सेवा करण्यासाठी आलो आहे.
कार्यक्रमाला व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतून देशाची सेवा करताना आज आठ वर्षे पूर्ण करत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी मी हा काळ घालवला. यासोबतच ते म्हणाले की, आज मी जे काही करू शकतो, ते मी तुमच्याकडून शिकलो आहे. मी राजकारण करण्यासाठी नाही, तर देशवासीयांची सेवा करण्यासाठी आलो आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर काही इंटरनेट युजर्सनी प्रतिक्रिया देत पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. विपिन सिंह नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिलेय की, तुम्ही अगदी बरोबर बोलले. पण तुमच्यासाठी देश म्हणजे फक्त अदानी आणि अंबानी आहेत हे लोकांना समजायला 7 वर्षे लागली. तसेच मुकेश मीणा नावाचे युजर्स लिहितात, ‘महाराज, एवढी सेवा नको, आता देशातील जनतेवर दया करा आणि झोला घेऊन निघून जा.’ काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी याला जोक ऑफ द डे म्हटले, तर काही लोकांनी म्हटले की तुम्ही मस्त विनोद केला आहे.