मुंबई – मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याच्या स्मृतीदिनाला देशात मोठा घातपाती कारवाया करण्याचा कट जैश ए महंमद या संघटनेने आखला असल्याची माहिती काश्मिरात हत्या केलेल्या अतिरेक्यांमुळे प्रकाशझोतात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर खात्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग हगोता.
Neutralising of 4 terrorists belonging to Pakistan-based terrorist organisation Jaish-e-Mohammed and the presence of large cache of weapons and explosives with them indicates that their efforts to wreak major havoc and destruction have once again been thwarted.
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2020
26/11च्या स्मृती दिनी मोठी घातपाती कारवाई करण्याचा कट जैश ए महंमद या संघटनेने आखला होता. काश्मिरातील नागरोटा येथील कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. त्यावेळी ही बाब उघड झाली होती.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतर बाजारपेठ सावरू लागली असताना असा हल्ला करण्याचा कट रचला असल्याचे गुप्तचर खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.