नवी दिल्ली :– पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राहुल गांधी आणि कॉंग्रेसची प्रतिमा बदनाम करण्यासाठी संगनमत झाले आहे असा आरोप कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार बोलत आहेत. पंतप्रधान आणि ‘दीदी’ यांच्यात राहुल गांधी आणि कॉंग्रेसची प्रतिमा खराब करण्याचा सौदा झाला आहे असे ते म्हणाले.
ममतांना ईडी-सीबीआयच्या छाप्यांपासून स्वतःला वाचवायचे आहे म्हणूनच त्या कॉंग्रेसच्या विरोधात बोलून मोदींना खूष करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे ते म्हणाले.
दरम्यान तिकडे ममता बॅनर्जी यांनी वेगळाच आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की भाजप राहुल गांधींना हिरो बनवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून कोणीही पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारू नये असे त्यांनी म्हटले आहे.
“…त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही”, शेतकरी प्रश्नावरून अजित पवार आक्रमक
दरम्यान, पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांपूर्वी, मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यांतील विविध भागांतील तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपचे 2,000 हून अधिक कार्यकर्ते कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत असा दावाही अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये मे आणि जूनमध्ये पंचायत निवडणुका होण्याची शक्यता आहे.