पुणे – नरेंद्र मोदी यांचा दिल्लीत शपथविधी सुरु असतांना पुणे येथे काल बहुजन आघाडीची बैठक पार पडली. लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या वंचित बहुजन आघाडीने आता आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मुद्यावर या बैठकीत चर्चा केली आहे. तसेच या बैठकीत निवडणुकीतील पराभवाची समीक्षा करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीतील चर्चेबाबत सांगितले की,’प्रारंभी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यांच्याप्रमाणे दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची आमची भूमिका आहे. आगामी विधानसभा निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी ही प्रमुख विरोधाची भूमिका पार पाडेल.’असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, विधानसभा निवडणूकीतही महायुतीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला.