नवी दिल्ली – रेल्वेचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नमूद करीत रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वेच्या खासगीकरणाची चर्चा निराधा असल्याचे म्हटले आहे. रेल्वेखात्याच्या लोकसभेत झालेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना गोयल बोलत होते. तथापी रेल्वेच्या काहीं कामात खासगी गुंतवणूक घेण्याचा सरकारचा विचार आहे. तर काही रेल्वे प्रकल्पांचे कंपनीकरण करण्याचाही प्रस्ताव आहे असे ते म्हणाले.
रेल्वेच्या विकासासाठी निधीची गरज असून त्यासाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणूक रेल्वेत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टर्नशिप अंतर्गत काही प्रकल्प आम्हाला हाती घ्यावे लागतील तसेच काही प्रकल्पांचे कंपनीकरण करावे लागेल असे ते म्हणाले. रायबरेली कोच फॅक्टरीतील एका युनिटचे कंपनीकरण केले जाणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.