पुणे : साधारण 500 उंबऱ्यांच्या या वसाहतीला बुधवारच्या पावसाचा तडाखा बसला. आंबील ओढ्याला अगदी लागून असलेल्या या घरांत गुडघाभर पाणी गुरुवारी दुपारपर्यंत होते. गॅस सिलिंडर, भांडी-कुंडी, टीव्ही, पलंग, घरगुती साहित्य, कपडे असं सगळंच ओढ्यानं गिळलं तिथं लेकरांच्या वही पुस्तकांची काय बात? दरम्यान, हे रहिवासी शासकीय यंत्रणेकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असून तातडीने पंचनामा करण्याची मागणी होत आहे.