मुंबई – रश्मी शुक्ला यांनी कथितरित्या केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर पोलिसांनी सुमारे दोन तास चौकशी केली. या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि त्यात राजकीय नेत्यांचा सहभाग या अनुषंगाने माहिती घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबई पोलिसांनी जबाब घेण्यासाठी फडणवीस यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर वांद्रे कुर्ला टर्मिनसपुढे शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन भारतीय जनता पक्षाने केले. पोलिस सह आयुक्तांनी फडणवीस यांना दूरध्वनी करून पोलीस अधिकारी घरी येऊन आपला जबाब नोंदवतील, असे सांगितल्याचे फडणवीस यांनी समाज माध्यमांद्वारे स्पष्ट केले. त्याला सामोरे जाण्यासाठी पुण्यातील पूर्व नियोजित दौरे रद्द करून फडणवीस मुंबईत थांबले.
फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. मुंबई सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले. यानंतर तब्बल दोन तासानंतर हे पथक बंगल्याबाहेर पडले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर गर्दी केली होती.
देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यापूर्वी 6 वेळा चौकशीसाठी नोटीस दिली होती. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलीस दुपारी 12 वाजता दाखल झाले होते. 12 ते 2 या काळात देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यात आला.