नवीदिल्ली – केंद्र सरकारने PFI वर पुढील 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केरळमधील आरएसएसच्या ५ नेत्यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. नुकतीच अटक करण्यात आलेल्या काही पीएफआय नेत्यांच्या चौकशीत अनेक आरएसएसच्या नेत्यांवर लक्ष्य असल्याचे समोर आले आहे.
नुकतेच एनआयएने देशभरातील पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यामध्ये अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली होती. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने केरळमधील आरएसएसच्या पाच नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता या नेत्यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे कमांडो तैनात करण्यात येणार आहेत. नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलल्याचे समजते.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अहमदिया मुस्लिम आणि तामिळनाडूला भेट देणारे परदेशी, विशेषत: ज्यू यांना लक्ष्य करण्याचा कट रचला असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तातडीने केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलली आणि आरएसएस नेत्यांना सुरक्षा दिल्याचे समजते.